बिबी/ भागवत आटोळे आज दिनांक 20/2/2025 रोजी सकाळी 9 वा दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील टोलनाक्यापासून 500 मीटर अंतरावर हुंडाई आय टेन कार क्रमांक- एम एच -04 एल बी- 3109 च्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गाने सदर कार मुंबईतहुन अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेज क्रमांक 318.8 जवळ नागपूर कॅरिडोरवर चालक नामे अभिजीत अर्जुन चव्हाण वय 35 वर्ष मुंबई यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार मिडीयम मधील क्रॅश बॅरिअरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कार च्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली. व कार ने तात्काळ पेठ घेतला. यामध्ये अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले 1)गणेश सुभाष टेकाळे वय 40 वर्ष व 2)राजू महंतलाल जयस्वाल वय 32 वर्ष दोन्ही रा मुंबई यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. व चालक अभिजीत अर्जुन चव्हाण वय 35 वर्ष हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ महामार्ग 108 ॲम्बुलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे , डॉक्टर यासीन शहा , डॉक्टर शैलेश दळी,चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ सदर जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले .व दोन्ही मृत पावलेले व्यक्ती यांना ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे ठेवण्यात आले असून. सदर मृतक यांचे नातेवाईक यांच्या यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे. अपघात घडला त्यावेळी तात्काळ समृद्धी महामार्ग QRV टीम व महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोहेकॉ विठ्ठल काळुसे, मुकेश जाधव ,संतोष वनवे ,संदीप किरके, अरुण भुतेकर व एम एस एफ स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या कारमधून बाहेर काढले. व सदर ठिकाणी तात्काळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे DYSP मनीषा कदम मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करीत आहे. व अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने मिडीयम मध्ये लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
