https://vruttamasternews.com/watar-level-news-226-2/
झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.
१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी _संपूर्ण पावसाळ्यात_ जमिनीत घेऊन जाऊ शकते. _याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत._
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.
२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]
३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी.* _याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल…!
झाडे लावा निसर्ग वाचवा.